ज्योतिषशास्त्राची ओळख भाग १

मित्रांनो, आज जर तुम्हाला कोण सांगितलं की पृथ्वी या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि इतर ग्रह त्याच्याभोवती फिरत आहेत आणि सूर्यही पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे तर तुम्हाला ते पटेल का? तर नाही पटणार. कारण सूर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह भ्रमण करत आहेत हे सिद्ध झालेलं विज्ञान आहे. मात्र,तीन शतकांपूर्वी तर अशीच मान्यता होती की पृथ्वीभोवती सूर्य व इतर ग्रह फिरत असतात. तशा परिस्थितीतही, म्हणजे जेंव्हा दुर्भिण व इतर कुठल्याही आधुनिक साधनांचा शोध लागला नव्हता तेंव्हा हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीं-महर्षींनी ब्रम्हांडात भ्रमण करणार्‍या ग्रहांची, त्यांच्या भ्रमनाची, त्यांच्यागतीची,गुणधर्मांची माहिती घेतली आणि असं एक शास्त्र विकसित केलं ज्याच्या आधारावर पृथ्वीवर राहणार्‍या मानवाच्या भविष्याबद्दल अंदाज वर्तविता येऊ शकतो. होय, आपण बोलत आहोत ज्योतिषशास्त्राबद्दल!

भविष्य हे प्रत्येक माणसाला खुणावत असतं. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची उत्सुकता आणि भीती माणसाला असतेच. ही भीती आणि उत्सुकता आजची नाही, तर शतकानुशतके अन पिढ्यानपिढ्या ती चालत आली आहे. ‘भविष्य’ हा असा एकमेव धागा आहे जो मानवासाठी किंवा ब्रम्हांडातील प्रत्येक सजीवासाठी महत्वाचा ठरला आहे.याच भविष्याचा वेध घेता यावा, अंदाज लावता यावा आणि त्यातून अनुकूलता-प्रतिकूलता लक्षात घेऊन सावधानतेने मार्गक्रमण करावे यासाठी ज्योतिषशास्त्र अत्यंत महत्वाचं आहे.

ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने ग्रहांचा, त्यांच्या गतीचा,त्यांच्या गुणधर्माचा आणि पर्यायाने त्यांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव याचा अभ्यास केला आहे. ज्योतिषशास्त्र ही एक वैदिक कालीन महत्वाची विद्या आहे. वेदांना जाणून घेण्यास मदत व्हावी म्हणून ज्या सहा वेदांगांची रचना झाली त्यातील ज्योतिष ही एक विद्या आहे. याशिवाय, ज्योतिष हे प्राचीन कालीन खगोलशास्त्रीय ज्ञानाशी निगडीत आहे. कालानुरूप यामध्ये चांगले-वाईट प्रवाह मिसळत गेले.

ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू या ग्रहांचा अभ्यास आहे. सूर्याभोवती हे सर्व ग्रह भ्रमण करत असतात. प्रत्येकाच्या भ्रमणाचा कालावधी, वेग वेगवेगळा आहे. त्या प्रत्येक ग्रहाची रचना,गुरुत्वाकर्षण, ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र इत्यादि वेगवेगळे आहे. ज्योतिषशास्त्रात या सर्वांना एका गणिती सूत्रात बांधलेलं आहे. १२ राशी आणि २७ नक्षत्रांच्या रूपात. त्यानुसार, एखादा ग्रह संक्रमण करत असताना तो कोणत्या कक्षेतून भ्रमण करतो, कोणत्या राशीत असतो, कुठल्या नक्षत्रात असतो याचं विश्लेषण करून राशिफळ निश्चित केलं जातं आणि त्यावरून भविष्याच्या संबंधित अंदाज व्यक्त केले जातात. एखादा व्यक्ति जन्मतो तेंव्हा आकाशात ग्रहांची स्थिती काय होती व ती सध्या कशी आहे याचा संयुक्तपणे अभ्यास करून माहितीचं विश्लेषण केलं जातं आणि त्यावरून पुढील काळातील घटनांचा अनुक्रम काय असू शकतो याबद्दल तर्क लावले जातात. यालाच फलज्योतिष म्हणतात! मागील भागात आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय? ते कसे काम करते? त्याचा पाया काय आहे? याबद्दल जाणून घेतलं. या भागात त्याबद्दल चे काही गैरसमज आणि त्याचे महत्त्व उदाहरणासह जाणून घेऊ या.